ज्वारी-बाजरी-नाचणी ‘ग्लोबल’ झाली, सूपरफूड म्हणून गाजणारे पारंपरिक मिलेट्स आपल्या आहारात आहेत का?

 

२०२२-२३ हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यानिमित्त मिलेट्सची चविष्ट चर्चा... 

 



मिलेट्स, तृणधान्ये/भरड धान्य, अतिशय पुरातन पीक. ख्रिस्तपूर्व ३५००-२००० काळापासून.
आशिया, आफ्रिका, झालेच तर साऊथ अमेरिका इथे एकेकाळी या भरड धान्यांचे उदंड पीक घेतले जायचे. त्या त्या ठिकाण, देश प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळी तृण/भरड धान्य पिकवली जायची. आपल्या पुरातन वेदात पण तृणधान्यांचा उल्लेख केलेला आहे.

आणि आता अचानक पुन्हा एकदा मिलेट्सची चर्चा होताना दिसते आहे. मिलेट्स सुपरफूड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०२२-२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.

मिलेट्स -सुपर फूड चर्चा

१. आज जगात सुपर फूड म्हणून आपली ज्वारी गणली जाते. 


ग्लुटेन इन्टॉलरंस म्हणजे गहू न पचणे या विकाराने गंभीर रूप घेतले आहे, अशांसाठी ज्वारी रामबाण ठरतेय.
२. फक्त ज्वारी नव्हे, तर आपण भारतीय, बाजरी, वरी, कोडो, नाचणी, राळा, कांग, कुटू, राजगिरा, संनवा अशी असंख्य तृणधान्ये पिढ्यानपिढ्या खात आलो आहोत; पण गेल्या काही काळात ती आहारात घेणं कमी झालं. मात्र भारतात मिलेट्स वैविध्यता खूप आहे. पूर्ण भारतात वेगवेगळी तृणधान्ये खाल्ली जातात.
३. आपला पारंपरिक आहार आठवून पाहा. त्यात मिलेट्सचा वापर अगदी रोजच्या जेवणापासून उपवासातही दिसतो. तृणधान्य वैशिष्टय म्हणजे ती पोषणमूल्य आणि पचन यात सरस असतात. गव्हाची चपाती /रोटी आणि ज्वारी/नाचणी भाकरी यात भाकरी पचायला अतिशय हलकी असते, हे सिध्द झाले आहे.
४. तृणधान्य फक्त भाकरीसाठीच वापरता येतात, हा समज असेल, तर तो चुकीचा आहे. उपमा, खीर, आंबील, डोसे, इडली, पुलाव, खिचडी असे अनेक पदार्थ करू शकतो.
५. त्यामुळेच मिलेट्सचा वापर आपल्या आहारातही असावा. लोकल-ग्लोबलचं हे नवीन चित्र आहे. आपल्या स्थानिक मिलेट्सच्या पारंपरिक पाककृतींचा आहारात समावेश करणं योग्यच.

जग पुन्हा नव्यानं भरडधान्य अर्थात मिलेट्सकडे वळते आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दिखाव्याला, प्रचाराला भुलून जगातील अनेक शेतकऱ्यांनी आपली तृणधान्य लागवडीखालील जमीन अन्य नगदी पिके अथवा धान्य यासाठी वापरली. परिणामी भूजलपातळी खालावली, जमिनीचा कस, मृदासंधारण निकृष्ट झाले.
आणि जग पुन्हा नव्यानं भरडधान्य अर्थात मिलेट्सकडे वळते आहे.
हवामान बदलाचा तडाखा हे त्यामागे अजून एक कारण असल्याचीही चर्चा दिसते.
त्यापुढे जाऊन हे ही लक्षात आले आहे की, स्थानिक भरड धान्यांची लागवड तुलनेनं स्वस्त असतेच; पण एकूणच हे पीक संकरित वाणापेक्षा चिवट असते. खत, कीटकनाशक याचा खर्च कमी होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे पाणी तुलनेत कमी लागते. यामुळे आज या तृणधान्य लागवडीवर जगातील अनेक विकसित राष्ट्रे लक्ष देत आहेत. काही वर्षे आधी तृणधान्ये म्हणजे गरीब, विकसनशील देशातील पीक समजले जायचे, आता मात्र चित्र बदलते आहे.




Comments

Popular posts from this blog

Mega Goa world Expo 2023 POOL BATH and SPA @ Dr. Shyama Mukherjee Prasad Indoor AC Stadium.

Status of Aadhar & Pan Card.....How to link Pan Card with Aadhaar Card?